मुंबई |लोकशक्ती|
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परिक्षेत (MPSC Exam) उत्तीर्ण होऊनही अद्याप नोकरी (Job) नसल्याच्या तणावातुन व आर्थिक परिस्थितीमुळे एका विद्यार्थ्याने (Student) गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी दुपारी साडे चार वाजता फुरसुंगी जवळील गंगानगर येथे घडली. या प्रकरणावरून विरोधकांनी महाविकास आघाडी सरकारला (mahavikas aghadi sarkar) धारेवर धरलं आहे. अनेक राजकीय वर्तुळातून यावर चर्चा सुरु आहे. दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (raju shetti) यांनीही राज्यसरकावर टिकास्र सोडले आहे.
शेट्टी पुढे म्हणतात, महाविकासआघाडी सरकारने आतातरी डोळे उघडून त्यांच्या प्रश्नाकडे डोळसपणे बघून त्यांना विश्वासात घेऊन त्यांचे प्रश्न सोडवावेत, अन्यथा हेच तरूण एक दिवस तुमच्या गळ्याला फास लावल्याशिवाय सोडणार नाहीत. असा इशारा त्यांना दिला आहे. याशिवाय त्यांनी विद्यार्थ्यांना आवाहनही केले आहे. यामध्ये ते म्हणाले, स्वप्नील लोणकर या तरुणाने MPSC कडून वेळेत मुलाखत न झाल्याने आत्महत्त्या केली. प्रिलियम व मेन्स क्लिअर केलेल्या स्वप्नीलचा मुलाखतीसाठी होणाऱ्या विलंबाने मात्र धीर खचला, त्याने जीव दिला. माझी सर्व विद्यार्थ्यांनी विनंती आपण अशी टोकाची भुमिका घेऊ नका.