उद्धव ठाकरे यांनी आज नागपूरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे. या भेटीचा तपशील उद्धव ठाकरे यांनी माध्यमांसमोर सांगितला आहे. उद्धव ठाकरे म्हणाले की, मला महाराष्ट्रात सुसंस्कृत राजकारणाची अपेक्षा आहे. आम्ही निवडणुक जिंकू शकलो नाही. ते जिंकले आणि त्याचे सरकारही स्थापन झाले . त्यामुळे साहाजिकच आहे या सरकारकडून महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घेतले जातील ही अपेक्षा आहे, तसेच जे निवडणुकीचे निकाल लागले आहेत, ते अनाकलनीय आहेत त्यामुळे जनतेच्या माध्यमातून ईव्हीएम विरोधात आवाज उठवू. असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे